” गुरु चरित्र पारायण सेवेने बदलेल आपले संपूर्ण आयुष्य ” ::: —-विविध स्वामी सेवा केंद्रांवर स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र वाचनाची दिव्य संधी …( दिनांक २१.०४.२०१४ ते २७.०४.२०१४) “श्री गुरूचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो. या वेदरूप ग्रंथात भगवान दत्त महाराज-श्रीपाद श्रीवल्लभ महाराज-श्रीनृसि ंहसरस्वती महाराज यांच्या अगाध लीलांपैकी काही लीलांचा समावेश केला आहे.अति दुःखी व पीडित तसेच विविध बाधांनी किंवा  कोणत्याही समस्येने  त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज त्याचे दुःख निवारण करतात. या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते, त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रुपांतर होवून प्रत्यक्ष दत्त महाराज तेथे वास करतात. या ग्रंथाचे प्रत्येक कुटुंबात दरमहा एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी चिरःकाल टिकते…… सर्व स्वामी भाविकांना विनंती कि त्यांनी आपल्या जवळ असलेल्या स्वामी सेवा केंद्रात, श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळात गुरुचरित्र ग्रंथाचे सामुदायिक पारायणात सहभागी व्हावे. व स्वामी सेवेची संधी सोडू नये. या विषयी अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या केंद्रात संपर्क करावा.